Israeli attack : थेट प्रक्षेपणादरम्यान इस्त्रायली हल्ला, बॉम्ब हल्ल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
इस्त्रायली हवाई दलाने थेट राजधानी तेहरानमधील इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम आयआरआयबीच्या (IRIB) मुख्यालयावर बॉम्बहल्ला केला.
इस्त्रायली हवाई दलाने थेट राजधानी तेहरानमधील इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम आयआरआयबीच्या (IRIB) मुख्यालयावर बॉम्बहल्ला केला.
मुंबईतील गोवंडी व कांदिवली येथील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत तीन विविध पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी हा निर्णय घेतला असून, न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्षाच्या शिक्षेचा दाखला देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला?
Sanjay Raut : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपण आहोत याचा अजित पवार यांना गर्व आणि अहंकार आहे. कुंडमळा पूल दुर्घटनेची जबाबदारी आपण घेणार आहात का झटकून टाकणार आहात? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणाऱ्या अॅक्सिअम मिशन 4 (Axiom-4) मोहिमेची नवी संभाव्य लॉन्च तारीख आता 19 जून निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती विज्ञान-तंत्रज्ञान आणि अंतराळ विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात वाद सुरू आहेत. ते सामन्याची चिन्हे नसून आता राष्ट्रवादीने मंत्री भरत गोगावले यांचे आर्थिक घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.
पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर रोष व्यक्त करत कठोर शब्दांत सवाल उपस्थित केले आहेत. “धोकादायक पूल असूनही तिथे संपूर्ण प्रवेशबंदी का लावली गेली नाही? तो पूल आधीच पाडून त्याऐवजी नव्याने सुरक्षित पूल का उभारला गेला नाही?” असा थेट सवाल करत राज ठाकरे यांनी सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले (Shivendra Singh Raje Bhosale) यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून कुंडमळा दुर्घटनेची माहिती घेतली. या मदतकार्यात राज्य सरकारला लागेल ती मदत देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात तेव्हा ते नेहमीच लव्ह जिहाद नसते. ते धर्माच्या पलीकडे जाते, असे मत प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करण्यात आपली भूमिका असल्याचा पुनरुच्चार करत मी खूप काही करतो, पण श्रेय मिळत नाही अशी खंत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.