प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी उपोषण आंदोलन मागे घेताना 2 ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच कर्ज गोठवा आणि नवीन कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा करा. कर्जमुक्ती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे.लाडकी बहिण योजना जाहीर करताना कोणता अभ्यास केला होता? सिंचन घोटाळ्याच्या गाडीभर फाईल दिल्या, तेव्हा त्यातून काय निष्पन्न झालं? अनेक घोटाळे तुमच्या कडे पाठविले, मात्र तुमचा अभ्यास कधी दिसलाच नाही. अभ्यास करून दिलेल्या कर्जमुक्तीचं काय वाटोळं झालं तेही जगाला माहिती आहे.