MNS-Thackeray : मनसे – ठाकरे गट युतीबाबत अमित ठाकरे म्हणाले, त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, दोन भावांनी बोललं पाहिजे
दोन भावांनी बोललं पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी माणसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चेवर दिली आहे. दोन्ही पक्ष एकत्र येण्यात आम्हाला काही प्रश्न नाही असेही ते म्हणाले.











