Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Rajnath Singh
देश-विदेश

Rajnath Singh : भगवान हनुमान यांच्या आदर्शाचे पालन केले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले कौतुक

भारतीय सैन्याने अद्भुत धैर्य आणि शौर्य दाखवून एक नवा इतिहास रचला आहे. सैन्याने अचूकता, दक्षता आणि संवेदनशीलतेने काम केले आहे. निश्चित केलेले टार्गेट उद्ध्वस्त करण्यात सैन्याला यश आले आहे. आम्ही कोणत्याही नागरी स्थानांवर हल्ला न करता मानवता आणि सतर्कता दाखवली आहे. आम्ही भगवान हनुमान यांच्या आदर्शाचे पालन केले आहे. जे त्यांनी अशोक वाटिका नष्ट करताना केले होते. आम्ही फक्त त्यांनाच मारले आहे, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारले होते, असे कौतुक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

operation sindoor
देश-विदेश

Operation Sindoor : कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग लष्करातील महिलांचा भक्कम आवाज

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक प्रहार केला. या धाडसी मोहिमेची माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह पत्रकार परिषद घेतली.

Masood Azhar
देश-विदेश

Masood Azhar : जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मॉस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जणांचा खात्मा

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मॉस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळचे ४ जण असा चौघांचा खात्मा झाला आहे. मसूद अजहरने स्वतः याची पृष्टी केली असून मी मेलो असतो तर बरे झाले असते असे म्हटले आहे.

Chandrashekhar Bawankule
मुंबई

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदेपंडितांशी सतत सल्लामसलत केल्यानेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले काैतुक

सर्वाेच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे . भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदेपंडितांशी सतत सल्लामसलत केली. आज त्याला यश आले, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Ashok Chavan
महाराष्ट्र

Ashok Chavan : भाजपचा झेंडा वरच्या क्रमांकावर लागला पाहिजे, अशाेक चव्हाण यांचे आवाहन

आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे की, आगामी काळात येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा झेंडा वरच्या क्रमांकावर लागला पाहिजे. सामूहिक पद्धतीने जोर लावून आपल्याला पुढे जायचे आहे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशाेाक चव्हाण यांनी केले आहे.

Chief Minister
महाराष्ट्र

Chief Minister : मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला 150 दिवसांचा दुसरा कृती आराखडा

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आला हाेता. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. आता विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित 150 दिवसांचा दुसरा कृती आराखडा मुख्यंमत्र्यांनी चोंडी (जि. अहिल्यानगर) येथे जाहीर केला.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : अहिल्यादेवींचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्याची घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी आणि इतर भाषांतही बनणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Foreign Secretary Vikram Misri
देश-विदेश

Foreign Secretary Vikram Misri : पाकिस्तान आणखी दहशतवादी हल्ले घडवून आणणार असल्याची माहिती मिळाल्यानेच राबवले ऑपरेशन सिंदूर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केली भूमिका

पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरून आणखी हल्ले घडवून आणले जाणार आहेत, अशी विश्वसनीय गुप्त माहिती भारताला मिळाली होती.त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या आत्मरक्षणाच्या अधिकाराचा वापर करून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. ही कारवाई अत्यंत संयमित, नियोजित आणि जबाबदारीने करण्यात आली असून तिचा उद्देश केवळ दहशतवाद्यांची पायाभूत रचना उद्ध्वस्त करणे हाच होता, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले.

देश-विदेश

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ला विरोधकांचाही पाठिंबा, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांचे लष्कराचे कौतुक

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या निर्णायक हवाई कारवाईस विरोधी पक्षांनाही पाठिंबा दिला आहे.

Operation Sindoor
देश-विदेश

Operation Sindoor भारताची पाकिस्तानवर जोरदार कारवाई : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिलं आहे.

Jayant Patil
मुंबई

Jayant Patil : आता तरी निवडणुका घेण्यास चालढकल करू नका, जयंत पाटील यांची अपेक्षा

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना निवडणूक आयोगास आवश्यकता भासल्यास निवडणूक घेण्याबाबत मुदतवाढ घेण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आडून निवडणुका घेण्यास चालढकल करू नये, अशीच आमची अपेक्षा आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

Supriya Sule
पुणे

Supriya Sule : विमानतळाच्या आजुबाजूला तुमचीच १२० एकर जमीन, ग्रामस्थांचा सुप्रिया सुळे यांच्यावर आराेप

पुरंदर तालुक्यात हाेणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला काही गावांतील शेतकरी विराेाध करत आहेत. काही राजकीय नेत्यांनी विमानतळाच्या परिसरात जमीनी घेतल्याचा आराेपही हाेत आहे.