Murlidhar Mohol “ हे पुणे आहे, येथे दादा नाही फक्त अण्णा!” प्रभाग ९ मध्ये सुद्धा ‘आण्णा’ च नागरिकांचा विश्वास
Murlidhar Mohol
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून, या दिवशी महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचे अध्यादेश निर्गमित केले आहेत.
साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती, त्याचा राग आजही काहींच्या मनात जिवंत आहे, हे विसरू नका. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव पुन्हा एकदा सुरू झाला असून मराठी माणसाने सावध राहण्याची गरज असल्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केले.
जुन्या वाड्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये वाडे व सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर शाश्वत उपाय म्हणून ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली. प्रभाग २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) परिसरात प्रचारार्थ नागरिकांशी संवाद फेरीदरम्यान ते बोलत होते.
आजवर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांच्या तातडीच्या सेवेसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ थेट त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवेल, अशी घोषणा राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केली. प्रभाग क्रमांक २५ मधील प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हा शब्द दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याबाबत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण पुण्यातून निवडणूक लढवणार नसून नागपूरमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राजकीय वातावरण तापले आहे. नाशिकमध्ये झालेल्या संयुक्त सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. “मुख्यमंत्री नाशिक दत्तक घेतो म्हणाले, पण हा बाप परत फिरकलाच नाही,” असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. या टीकेला आता फडणवीसांनी थेट उत्तर दिले आहे.
Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील ‘सुवर्णगड’ या निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगेमुळे घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
काँग्रेसच्या निवडणुकीच्या राजकारणामुळे लाडक्या बहिणींची (Ladki Bahin) संक्रांत कडू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संक्रांतीच्या काळात हप्ता देऊ नये अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिले आहे.
आपण एकत्र आलो नाही तर अमित आणि आदित्य दोघेही बेरोजगार होऊन जातील, या भीतीने हे दोन भाऊ आता एकत्र आले आहेत.अदा टोला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.
आपल्या निर्भीड राजकीय मतांसाठी आणि कोरोना काळात केलेल्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध असलेले लंडनस्थित डॉ.संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अनपेक्षित कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२६ शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी ठाणे पोलिसांनी कडक सुरक्षा उपाययोजना राबवत मोठी कारवाई केली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड, अमली पदार्थ, अवैध दारू तसेच घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.