काँग्रेसच्या भ्रष्टाचाराने पोखरलेली नागपूर जिल्हा बँक येणार नफ्यात, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

नागपूर : काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे नागपूर जिल्हा बँक पोखरली गेली. घोटाळ्यांमुळे बंद पडली. राज्य सहकारी बँकेला प्रशासक म्हणून बसविले आहे. पुढील तीन वर्षात बँकेचा कायापालट होऊन बँक नफ्यातील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे नागपूर जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना अक्षरशः नागवले. भ्रष्टाचारामुळे पोखरली गेलेली बँक घोटाळ्यामुळे बंद पडली. या बँकेवर प्रशासक म्हणून महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेला बसवले आहे. पुढच्या तीन वर्षात बँकेचा कायापालट होणार आहे.

नागपूर जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची ‘संस्थात्मक प्रशासक’ म्हणून नेमणूक होत आहे. सहकारातील हा अभिनव प्रयोग आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या १३ वर्षांपासून तोट्यात आहे. या बँकेचा तोटा २९८ कोटींवर गेला आहे. ही बँक पुढील दीड ते दोन वर्षांत नफ्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार या बँकेचे अध्यक्ष होते. त्यांना याप्रकरणी शिक्षा देखील झाली आहे.

बँकेचे १२४ न्यायालयीन प्रकरणे आहेत. त्यापैकी ६६ टक्के प्रकरणे बँकेने दाखल केले आहेत. ते न्यायालयाबाहेर तडजोडीने सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहेत. या संपूर्ण प्रकरणे सुमारे २०० कोटी रुपयांचे आहेत. पहिल्या दहा कर्ज बुडव्यांकडे १४९ कोटी रुपये आहेत. त्यांंनी प्रारंभी सवलतीची योजना देण्यात येईल. परंतु शेवटचा पर्याय म्हणून त्यांच्याकडून सक्तीची वसुली केली जाणार आहे.

Nagpur District Bank, which was ravaged by Congress corruption, will return to profit, Chief Minister is confident

महत्वाच्या बातम्या

.