Sanjay Raut : विमान अपघाताची जबाबदारी कोण घेणार? संजय राऊत यांचा अमित शाह यांना सवाल

Sanjay Raut : विमान अपघाताची जबाबदारी कोण घेणार? संजय राऊत यांचा अमित शाह यांना सवाल

Sanjay Raut questions Amit Shah

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आधी पहलगाममध्ये नागरिकांवर झालेला हल्ला, मुंबईतील रेल्वे अपघात आणि आता अहमदाबादमध्ये झालेला विमान अपघात या घटनांची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केला आहे. Sanjay Raut questions Amit Shah

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 30 सेकंदात हा भीषण अपघात झाला. यावरून राऊत म्हणाले “अहमदाबादमध्ये घडलेली अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. एअर इंडियाचे विमान कोसळणे ही या देशातील हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे.

अत्यंत सुरक्षित समजले जाणारे ड्रीमलायनर हे टेक ऑफनंतर एका मिनिटाच्या आत कोसळते आणि त्यातील एक प्रवासी वगळता 241 प्रवाशांचा मृत्यू होतो. विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळले, त्यातील 24 डॉक्टर आणि मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात. शेकडो कुटुंबांची राखरांगोळी होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे माझेही राज्यसभेतील सहकारी होते. त्यांचेही या अपघातामध्ये निधन झाले. एवढ सगळं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही.



“पहलगामसारखा दहशतवादी हल्ला होतो, रेल्वेचे अपघात होतात आणि अनेक लोकांचे बळी जातात. पण सरकारच्या चेहऱ्यावर दुखाची रेषा, वेदना, पश्चात्ताप दिसत नाही.” असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला. “अहमदाबादमध्ये अपघातावर कोणी राजकारण करू नये. निधन झालेल्या प्रवाशांमध्ये भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील, ते आपल्या भारतातून एअर इंडियाने प्रवास करत होते. यामुळे भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एअर इंडियाचे खासगीकरण सरकारने केले आणि टाटा समुहाकडे दिले. टाटाने मृतांच्या वारसाला प्रत्येकी एक कोटी दिले म्हणून प्रश्न सुटत नाहीत.” असे ते पुढे म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी (12 जून) माध्यमांना अपघाताच्या घटनास्थळाच्या पाहणीनंतर प्रतिक्रिया दिली. यावर संजय राऊत म्हणाले की, “एवढा मोठा अपघात होतो. हा अपघात आहे, अपघात टाळता येत नाही, असे अमित शाह म्हणतात. यावेळी या देशावर कोणत्या प्रकारचे राज्य लादलेले आहे? हे दिसते. रेल्वेचा अपघात टाळता येत नाही, पहलगामचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबादसारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना टाळता काय येते?” असा सवाल करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला. “ड्रीमलायनर जेव्हा विकत घेतली तेव्हा त्याच्या खरेदी बाबत, तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भाजपचेच लोकं होते. आपण संसदेतील रेकॉर्ड पाहू शकता. प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मंत्री होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भाजपचे लोकं होते,” असे आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.

Who will take responsibility for the plane crash? Sanjay Raut questions Amit Shah

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023