विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यात हिंदी नाही तर मराठी भाषा सर्व माध्यमांच्या शाळांना अनिवार्य आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सूत्र राबविले जात आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ( Not Hindi, only Marathi is mandatory in the state, School Education Minister Dada Bhuse clarified that the trilingual formula should be made so that students do not fall behind.)
राज्यभरात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात त्रिभाषी सूत्र अनिवार्य करण्यात आले. पण या धोरणामध्ये हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात आली. पण महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती नको, असे म्हणत पालकांनी, शिक्षक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी सरकारला विरोध केला. त्यानंतर आता या त्रिसूत्री धोरणात राज्य सरकारने बदल करत हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, असे जाहीर केले आहे. पण यासाठीही आता विरोध होऊ लागला आहे. कारण महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांचे शिक्षण दिले जाते.
हिंदी भाषा ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल याबाबत स्पष्टीकरण देताना दादा भूसे म्हणाले की, राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक असणार आहे. इयत्ता पाचवीपासून हिंदी विषय आहे. तो बऱ्याच वर्षांपासून शिकविला जात आहे. इतर माध्यमांच्या शाळेत त्यांची भाषा, मराठी भाषा, इंग्रजी तिसरी भाषा असणार आहे. काल पहिली ते चौथीसाठी जो शासन आला आहे त्यात कुठेही ‘अनिवार्य’ शब्द नाही. त्यामुळे हिंदी विषय घ्यायचा का नाही हे विद्यार्थी ठरवतील. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा शिकवली जाणार आहे. ते नियोजन करताना त्या वर्गातील किमान 20 विद्यार्थ्यांनी मागणी केली तर शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. पण एखादं दुसरा विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी ऑनलाइन पर्याय किंवा अन्याय पर्याय उपलब्ध करून देऊन ती भाषा शिकवली जाणार असल्याचे दादा भूसे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
Not Hindi, only Marathi is mandatory in the state, School Education Minister Dada Bhuse clarified that the trilingual formula should be made so that students do not fall behind.
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी