विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दि हिंदू या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात इस्लामी प्रजासत्ताक इराणला स्पष्ट पाठींबा दर्शवला आहे. त्याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर ‘ टीका करताना भारताच्या संतुलित आणि सामरिक भूमिका धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
सोनिया गांधींच्या या भूमिकेमागे भारतातील मुस्लीम मतदारांचा गट खुश ठेवण्याची स्पष्ट रणनीती असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यांनी आपल्या लेखात इराणला ‘पश्चिमी वर्चस्व आणि इस्रायली आक्रमणाचा बळी’ म्हणून सादर करत इस्रायलला नकारात्मक पद्धतीने चितारले. त्यांनी 1994 मध्ये काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगात भारतविरोधी ठराव रोखण्यात इराणच्या मदतीचा दाखला दिला, पण त्यानंतर इराणने केलेले अनेक यूटर्न आणि काश्मीरबाबतच्या विरोधी वक्तव्यांवर मात्र मौन बाळगले.
इराणचे सर्वोच्च नेते अली होसेनी खामेनेई यांनी 2017 पासून काश्मीरला ‘स्वतंत्र भूभाग’ म्हणून दर्शवण्याचा प्रयत्न केला असून, त्यांनी ‘काश्मिरी मुस्लिमांवर अन्याय होतोय’ असा आक्षेपार्ह मजकूर वारंवार ट्विट केला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये अनुच्छेद 370 हटवल्यानंतर त्यांनी भारत सरकारवर मुस्लिमांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप केला होता. मार्च 2020 मध्ये त्यांनी पुन्हा ‘भारत सरकारने हिंदू अतिरेक्यांना थांबवावे’ असा मजकूर प्रसारित केला होता.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने इस्रायल व इस्लामी देशांशी समांतरपणे मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवत आपले राष्ट्रीय हित जोपासले आहे. भारत इस्रायलसोबत संरक्षण, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात घनिष्ठ सहकार्य करत असतानाच, सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांशीही ऊर्जानिर्भरतेसंबंधी महत्त्वाचे करार करत आहे. त्यामुळे कोणत्याही एका गटाचा पाठींबा घेत न करता भारताने ‘नॉन-अलाइंड’ धोरणाचे समर्पक पालन केले आहे.
काँग्रेस पक्षाने मात्र निवडणुकीपूर्वी मुस्लिम मतबँकेसाठी ‘उम्मा’च्या बाजूने झुकाव दर्शवत, भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याचाच एक भाग म्हणून प्रियंका गांधी वड्रा यांनी देखील यापूर्वी इस्रायलवर तीव्र टीका केली होती.
सोनिया गांधी यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, “मोदी सरकारने इस्रायल-इराण संघर्षात निष्क्रिय भूमिका घेत भारताच्या ऐतिहासिक मूल्यांना तिलांजली दिली आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही, भारताने स्पष्टपणे भूमिका घेऊन पश्चिम आशियात शांतता आणि संवादाचे प्रयत्न करावेत.”
भारताची भूमिकाच म्हणजे “दोन्ही बाजूंशी मैत्री, पण कोणालाही आंधळेपणाने पाठिंबा नाही”. अशी आहे. काँग्रेसच्या विधानांमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा गढूळ करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी मोदी सरकारने जागतिक संघर्षांमध्ये सजग संतुलन राखून, भारताच्या हितांचेच संरक्षण केले आहे. आजच्या ध्रुवीकरण झाल्या जागतिक राजकारणात हीच भूमिका भारताला अधिक विश्वासार्ह बनवते.
Congress supports Iran to appease ‘Muslim vote bank’; Attempt at hate politics while criticizing Modi government
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी