विशेष प्रतिनिधी
पाटणा : , Manohar Lal Khattar बिहारमध्ये अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची केंद्र सरकारची पूर्णपणे तयारी असल्याची घोषणा केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी पाटण्यात एका केली. भारत सरकार संपूर्ण देशभरात सहा अणुऊर्जा केंद्रे (Small Modular Reactors (SMRs) स्थापन करणार आहे.Manohar Lal Khattar
पाटणा येथे आयोजित पाचव्या पूर्व राज्यांच्या ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत खट्टर बोलत होते. यामध्ये बिहारसह पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड इत्यादी राज्यांच्या मंत्र्यांचा सहभाग होता. माध्यमांशी संवाद साधताना खट्टर म्हणाले, “जर बिहार सरकार अणुऊर्जा प्रकल्प उभारू इच्छित असेल, तर केंद्र सरकार त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार आहे.”
बिहारला पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त ५०० मेगावॅट वीज पुरवण्यात येणार आहे. या बैठकीत २०३५ पर्यंतच्या ऊर्जा धोरणाचा आढावा घेण्यात आला, तसेच पूर्व भारतातील सध्याच्या वीज परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
खट्टर म्हणाले, “पूर्वी बिहारला ऊर्जा क्षेत्रात मागास मानलं जात होतं. पण आज त्याने स्मार्ट मीटर बसवण्यात विक्रमी कामगिरी केली आहे. आता बिहारने स्वतःहून अणुऊर्जा प्रकल्पाची मागणी केली असून, केंद्राने त्यास मान्यता दिली आहे.”
भारत सरकारने अलीकडेच Small Modular Reactors या नव्या प्रकारच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. SMRs हे पारंपरिक मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या तुलनेत कमी खर्चिक आणि अल्प वेळात उभारता येणारे प्रकल्प असून, सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे अधिक परिणामकारक मानले जातात. विशेषतः मध्यम क्षमतेच्या गरजेसाठी, तसेच ज्या ठिकाणी मोठे अणुप्रकल्प उभारणे अशक्य आहे, अशा भागांमध्ये SMRs उपयुक्त ठरतात.
खट्टर यांनी भारताच्या ऊर्जाक्षेत्रातील प्रगतीवर समाधान व्यक्त करत सांगितले की, “२०१३-१४ मध्ये भारतात वीज तूट ४.५% होती. पण आज भारत केवळ स्वतःची गरज भागवत नाही, तर भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळसारख्या शेजारी देशांनाही वीज निर्यात करत आहे. भारत ऊर्जाक्षेत्रात आत्मनिर्भर होऊ लागला आहे.”
खट्टर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, केंद्राने सर्व राज्य सरकारांना सूचित केलं आहे की ते त्यांच्या राज्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पांची शक्यता तपासून त्याचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवावेत. सध्या भारतामध्ये ८ गीगावॅट अणुऊर्जा उत्पादन होते, आणि २०४७ पर्यंत १०० गीगावॅट उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
खट्टर यांनी सांगितले की गोवामध्येही अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची शक्यता तपासण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर आणि नागरी विकासमंत्री विश्वजित राणे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. गोव्यात सध्या कोणताही थर्मल, जल किंवा सौर प्रकल्प नाही. त्यामुळे ते पूर्णतः इतर राज्यांवर अवलंबून आहेत.
Central government to set up nuclear power project in Bihar; BJP’s big announcement before elections
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी