विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Nepal’s नेपाळमध्ये जनरेशन Z च्या आंदोलनाने ओली सरकारचा पाडाव केला आणि संपूर्ण देश हादरला. भारतातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु तज्ज्ञांच्या मते भारतीय तरुणाईची मानसिकता, सामाजिक रचना आणि संस्थात्मक ताकद यामुळे नेपाळसारखा उठाव इथे होणे जवळपास अशक्य आहे.Nepal’s
यासाठी इतिहासातील एक संदर्भ महत्त्वाचा ठरतो. आसाममध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने राज्य सरकार उलथून टाकले होते. प्रफुलकुमार महंत यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनातून तरुणच थेट सत्तेत आले. मात्र ते प्रादेशिक आणि विशिष्ट परिस्थितीतून उभं राहिलेलं आंदोलन होतं. देशपातळीवर अशा प्रकारचा उठाव घडवणं आजच्या काळात शक्य नाही, यावर जाणकारांचा भर आहे.Nepal’s
भारतीय जनरेशन झेड ही सोशल मीडियाच्या युगातील पिढी आहे. ते घोषणांवर आंधळेपणाने विश्वास ठेवत नाहीत; प्रत्येक गोष्ट तपासतात, प्रश्न विचारतात आणि मगच भूमिका घेतात. त्यामुळे “लोकशाही धोक्यात आहे” किंवा “वोट चोरी” अशा घोषणांनी लाखो युवक रस्त्यावर उतरतील, अशी अपेक्षा व्यर्थ आहे.Nepal’s
भारताची सेना पूर्णपणे अपराजकीय असून फक्त राज्यघटनेला निष्ठावान आहे. पोलिस आणि देखरेख यंत्रणा सशक्त आहेत. त्यामुळे नेपाळसारखे रस्त्यावरचे आंदोलन शासन उलथून टाकेल, हे वास्तवात बसत नाही.
दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुका हा नाराजी व्यक्त करण्याचा कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे असंतोष मतपेटीतून व्यक्त होतो. दुसरीकडे करिअरचा दबाव, परीक्षांचे टार्गेट्स, नोकरीसाठीची धडपड आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा यामुळे तरुणाईला गुन्हेगारी नोंदींचा धोका पत्करायचा नसतो.
युवक आपली नाराजी डिजिटल पद्धतीने मीम्स, रील्स आणि हॅशटॅग्सद्वारे व्यक्त करतात. हा सुरक्षित मार्ग असल्याने राग ऑनलाईनच मर्यादित राहतो. याउलट नेपाळने सोशल मीडियावर बंदी घातल्याने आंदोलन रस्त्यावर आलं.
भारतातील संताप जाती, प्रांत, भाषा आणि विचारधारेनुसार विखुरलेला आहे. सर्वांचा एकमुखी “सरकार बदल” घोषणेत बदल होणं अवघड आहे. शिवाय भारतीय कुटुंब व समाज स्थैर्याला महत्त्व देतात. मुलं आंदोलनासाठी क्लास बुडवत असतील तर पालकच त्यांना घरी ओढून आणतात.फूड डिलिव्हरी, नेटफ्लिक्स, इंस्टाग्राम, गेमिंगमुळे असंतोष तक्रारींपुरता राहतो, बंडखोरीत रूपांतर होत नाही.
तरुणाईच्या आंदोलनाने सरकारं बदलू शकतात. पण राष्ट्रीय पातळीवर भारतात असा उठाव घडण्याची शक्यता नाही. कारण भारतीय तरुणाई जागरूक, व्यावहारिक आणि आपल्या भविष्यासंबंधी गंभीर आहे. बदल हवा असेल तर त्यासाठी मतपेटी हाच एकमेव मार्ग आहे, हे त्यांना ठाऊक आहे.
…so India’s Gen Z will never stage an uprising like Nepal’s
महत्वाच्या बातम्या
- Vice Presidential election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांना दणका; तब्बल 30 मते फुटली !
- Ayush Komkar murder case : आयुष कोमकर हत्या प्रकरण; बंडू आंदेकरसह 8 जण अटकेत
- double-decker buses : आता पुण्यातही धावणार डबल-डेक्कर बस?
- Pune Commissioner : पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्त घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!