विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bhagat Singh Koshyari माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांनाच भाजप सन्मानित करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.Bhagat Singh Koshyari
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारी रोजी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कारांचा समावेश असून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांनी गौरवले जाते. यंदाच्या यादीत महाराष्ट्रातील काही मान्यवरांचा समावेश असला तरी, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले
याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता!
महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते!
छान! pic.twitter.com/5xrZ0u6c9q— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2026
या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले,
“महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजप सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्मभूषण किताब दिला. याच व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते. छान!”
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर खोचक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांच्या मते, भाजपने नेहमीच महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणाऱ्या व्यक्तींना पाठबळ दिले आहे.
भगतसिंह कोश्यारी हे २०१९ ते २०२३ या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राज्यात तीव्र राजकीय वाद निर्माण झाले होते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक सुधारकांबाबत केलेल्या विधानांमुळे मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता.
आता त्याच कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, संजय राऊत यांच्या टीकेमुळे हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
Padma Bhushan to Bhagat Singh Koshyari Sparks Outrage; Sanjay Raut Slams Centre Over ‘Insult to Maharashtra’
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर
- Raju Patil : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, मनसे नेते राजू पाटील यांची भाजपवर टीका
- Navnath Ban : औरंगजेब किंवा अफजल खान यांचा उदो-उदो चालणार नाही, नवनाथ बन यांचा इशारा
- River front : नदी सुधार प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे; फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार उद्घाटन!