विशेष प्रतिनिधी
नागपूर : Dattatraya Meghe विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.Dattatraya Meghe
दत्ता मेघे यांनी तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली. सौम्य स्वभाव आणि मृदू भाषेमुळे त्यांनी कार्यकर्त्यांचा मोठा गट तयार केलाDattatraya Meghe
होता. त्यांच्या निधनाची बातमी रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास समोर आली आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला.Dattatraya Meghe
राजकीय प्रवास
दत्ता मेघे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून चार वेळा प्रतिनिधित्व केले. तसेच नागपूर (१९९१), रामटेक (१९९६) आणि वर्धा (१९९८) या तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवणारे ते विदर्भातील एकमेव नेते ठरले.
त्यांनी लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणूनही काम पाहिले, तसेच तीन वेळा विधान परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पक्षाच्या निवडणूक रणनीतीत सक्रिय सहभाग घेतला.
दत्ता मेघे यांनी वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि मोठे रुग्णालय उभारून विदर्भात आरोग्य सेवा आणि शिक्षणाचा विस्तार केला. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली.
वैयक्तिक नाते आणि विश्वासदत्ता मेघे आणि
नितीन गडकरी यांच्यातील विश्वासाचे नाते विशेष चर्चेत राहिले. स्वतः मेघे यांनीच त्यांच्या मृत्युपत्रात गडकरी यांचे नाव नमूद केल्याचे सार्वजनिकपणे सांगितले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याची घनिष्ठता अधोरेखित झाली होती.
दत्ता मेघे यांच्या निधनामुळे विदर्भातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.
Senior Vidarbha Leader Dattatraya Meghe Passes Away
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास