Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आध्यात्मिक शक्तीने महाराष्ट्रातील व्होट जिहादचा पराभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात व्होट जिहादचा प्रयोग झाला. आध्यात्मिक शक्तीने या व्होट जिहादचा पराभव केला असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे

कोथरूड कथित मारहाण प्रकरणात ससून रूग्णालयाचा अहवाल, मुलींच्या अंगावर कोणत्याही ताज्या जखमा नाहीत

कोथरूड प्रकरणात तिन्ही मुलींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र ससून रूग्णालयातील अहवालात या मुलींच्या अंगावर कोणत्याही ताज्या जखमा नसल्याचे म्हटले आहे

Chief Minister's Relief Fund
महाराष्ट्र

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः पुणे विभागात मागील सात महिन्यामध्ये रूग्णांना तब्बल ५४ कोटी ९१ लाख ३७ हजार रूपयांची मदत दिली गेली आहे.

महाराष्ट्र

वनताराच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, नांदणी मठानजीक महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास करणार मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वनताराच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.

Bachchu Kadu
महाराष्ट्र

Bachchu Kadu : शेतकऱ्यांसाठी मुंबई एक दिवस बंद राहिली पाहिजे, बच्चू कडू यांनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली अपेक्षा

देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावे. इथूनच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आवाज उठावा. मुंबई शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे, अशी आमची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून अपेक्षा आहे, असे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सांगितले.

Jain community
मुंबई

कबुतरखान्यावरील ताडपत्र्या काढून टाकल्याने जैन समाजाच्या आंदोलकांशी पोलिसांसोबत झटापट

जैन समाजाच्या आंदोलकांकडून मुंबईतील दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आणि बांबू काढून टाकल्याने पोलिसांसोबत झटापट झाली

Mahadev Munde
महाराष्ट्र

Mahadev Munde महादेव मुंडे खून प्रकरणात माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस

महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकाला रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

Aarti Sathe
मुंबई

Aarti Sathe : आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून झालेली नेमणूक वादाच्या भोवऱ्यात

आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून झालेली नेमणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांच्या न्यायाधीशपदी नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली आहे.

Parinay Fuke
महाराष्ट्र

Parinay Fuke : विपर्यास केले सांगत परिणय फुके यांनी शिवसेनेचाही बाप मीच वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी

मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचाही बाप मीच वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच असे वक्तव्य केले होते. दरम्यान फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. फुके यांनी माफी मागावी अन्यथा, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेने दिला होता.

Chhagan Bhujbal
मुंबई

Chhagan Bhujbal : आनंदाचा शिधा यंदाच्या गणेशोत्सवात नाही, लाडकी बहीण योजनेचा फटका

यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नसल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने आनंदाचा शिधा देऊ शकत नाही, असे भुजबळ यांनी स्पष्टच सांगितले आहे.
आनंदाचा शिधा या योजनेतून राज्यातील गरिबांना सणासुदीच्या काळात केवळ 100 रुपायांमध्ये चार वस्तू योजनेच्या माध्यमातून मिळत होत्या. परंतु, आता लाडकी बहीण योजनेमुळे गोरगरिबांना सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे

Chief Minister fadanvis
मुंबई

Chief Minister fadanvis : अनुपम खेर यांनी माझा डायलॉग चोरला, मुख्यमंत्री म्हणाले माझ्याकडे ‘मी पुन्हा येईन’ याचा कॉपीराइट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुपम खेर यांच्यावर चक्क चोरीचा आरोप केला आहे. अनुपम खेर यांनी माझा डायलॉग चोरलेला आहे, ते म्हणाले ‘मी पुन्हा येईन’ याचा कॉपीराइट माझ्याकडे आहे, असे मुख्यमंत्री यांनी म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला.

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : न्यायपालिकेतही भाजपाचा थेट प्रवेश, निष्पक्षपणा धोक्यात? हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.