Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Harshwardhan Sapkal
पुणे

Harshwardhan Sapkal : संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेशाच्या निर्णयामुळे काँग्रेसला धक्का, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा फडणवीसांवर थेट आरोप

तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचाराजीनामा दिला असून 22 एप्रिल रोजी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी थोपटेंना “आत्मघाती निर्णय घेऊ नये” अशी विनंती वजा सूचना केली असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

raj thackeray
मुंबई

Raj Thackeray : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? राज ठाकरे म्हणाले इगो नाही, कठीण नाही, फक्त इच्छेचा प्रश्न

महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय ठरलेला प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरामुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.राज ठाकरे म्हणाले, “एकत्र येणं कठीण नाही, फक्त इच्छेचा प्रश्न आहे.

devendra fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगर उद्योगांचे नवे केंद्रबिंदू, नवीन उद्योगांची रांग, आणखी ८ हजार एकर भूसंपादनाचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे आता महाराष्ट्राचे ‘उद्योग मॅग्नेट’ बनत चालले आहेत, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. सध्या औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेली १० हजार एकर जमीन पूर्णतः व्यापली गेली असून, एकही प्लॉट उरलेला नाही. त्यामुळे नव्या उद्योगांसाठी आणखी ८ हजार एकर जमीन भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

देश-विदेश

मुर्शिदाबाद मध्ये NCW अध्यक्षांसमोर दंगल पीडित महिलांचा प्रचंड आक्रोश; त्यांचे दुःख आणि वेदना मांडायला शब्द अपुरे!!

पश्चिम बंगाल मधल्या मुर्शिदाबाद मध्ये दंगल पीडित महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्यासमोर आज प्रचंड आक्रोश केला.

Dhananjay Munde
मुंबई

Dhananjay Munde : “अर्धांगवायू नाही, मला बेल्स पाल्सी”, धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि सक्रीय राजकारणातून दूर असलेले आमदार धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत विविध तर्कवितर्क रंगू लागले होते. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी , “धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांचे डोळे वाकडे झाले असून त्यांना नीट बोलताही येत नाही,” असं सांगितल्याने ही चर्चा आणखी गडद झाली.मात्र या सगळ्यावर धनंजय मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.

Anurag Kashyap
मुंबई

Anurag Kashyap : शब्द मागे घेणार नाही, पण माफी घ्या हवी असेल तर म्हणत ब्राह्मणांवर वादग्रस्त विधानानंतर अनुराग कश्यपचा माफीनामा

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याने ब्राह्मण समाजावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर टीका, ट्रोलिंग आणि कायदेशीर कारवाईच्या मागणीनंतर अनुरागने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत माफीनामा जाहीर केला आहे. मात्र, त्याने स्पष्ट केलं की, ही माफी संपूर्ण पोस्टसाठी नसून फक्त त्या एका ओळीसाठी आहे, जी त्याच्याच मते ‘आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट’ काढून वापरली जात आहे.

Harshwardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : हिंदीच्या माध्यमातून हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपचा अजेंडा, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आराेप

हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा अजेंडा असून अशा सक्तीला काँग्रेसचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.

Rajnath Singh
महाराष्ट्र

Rajnath Singh : इतिहासाच्या पुस्तकांमध्ये औरंगजेबाला ग्लोरिफाईड केले, डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांवर राजनाथ सिंह यांचा आरोप

आता महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक आहेत, मुघल शासक औरंगजेब नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम सैनिकही होते.औरंगजेबासारख्या क्रूर आणि निर्दयी शासकालाही आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ग्लोरिफाईड केले गेले आहे. या चुकीच्या इतिहासामुळे काही लोक औरंगजेबाला हिरो बनवण्याचा प्रयत्न करतात. सत्य जाणून न घेता औरंगजेबाबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

Sanjay Nirupam
मुंबई

Sanjay Nirupam : इंग्रजीत मुले शिकतात त्यांचाच हिंदीला विराेध, संजय निरुपम यांचा आराेप

हिंदी देशाची भाषा आहे. मुलांना मूलभूत हिंदी शिकण्यात काहीही गैर नाही. जे हिंदीला विरोध करतात, ते इंग्रजीला विरोध करत नाहीत. त्यांची मुले इंग्रजीत शिकतात, ते चुकीचे नाही, पण ते हिंदीला विरोध करत आहेत.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : काँग्रेसमध्ये ये नाहीतर तुला टाडा लावतो… काँग्रेसप्रमाणे धमकावले जात असल्याचा उध्दव ठाकरेंचा आरोप

राज्यात सुरुवातीला काँग्रेस दरारा होता. तेव्हा पोलिसांकडून शिवसैनिकांना धमक्या यायच्या की, तू काँग्रेसमध्ये ये नाहीतर तुला टाडा लावतो. आता सुद्धा तेच सुरू आहे. पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जात असून पक्ष फोडले जात आहेत. जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत. पक्षांना नामोहरम करण्याचे काम केले जात आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Mahayuti government
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय, ६८ तालुक्यांत नवीन बाजार समित्या

महायुती सरकारने राज्यातील ज्या ६८ तालुक्यांत बाजार समित्याच नव्हत्या अशा तालुक्यांत नवीन बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis
पुणे

Devendra Fadnavis चापेकरांच्या बलिदानातून स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

रॅंडच्या वधानंतर फाशीवर जाताना चापेकर बंधुंना क्षणभरही पश्चाताप अथवा भिती वाटली नाही. त्यांच्या बलिदानातून देशात क्रांतिकारकांची मोठी फळी उभी राहिली.