Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Deenanath Mangeshkar Hospital
महाराष्ट्र

Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, मुख्यमंत्री कक्षालाही दिला नाही प्रतिसाद, मुख्यमंत्र्यांनीच सुनावले

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर संताप व्यक्त होत असताना या रुग्णालय प्रशासनाची मुजोरीही समोर आली आहे. तनिषा भिसे प्रकरणात मुख्यमंत्री कक्षालाही या रुग्णालयाने प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून रुग्णालयाला सुनावले आहे.

Maharashtra IAS Transfer
महाराष्ट्र

Maharashtra IAS Transfer : राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आपले सत्र राज्य सरकारने सुरूच ठेवले असून मंगळवार, 8 एप्रिल रोजी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. त्या पदावर आठवड्याभराने हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता मेश्राम यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

The Waqf Amendment
देश-विदेश

The Waqf Amendment : वक्फ सुधारणा कायदा देशभरात लागू

बहुचर्चित आणि वादग्रस्त वक्फ सुधारणा कायदा मंगळवार, 8 एप्रिलपासून देशभरात लागू झाला. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक संमत झाल्यानंतर शनिवार, 5 एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. ज्यामुळे त्याचे कायद्यात रुपांतर झाले. या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होण्यापूर्वी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. यामध्ये आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश दिला जाऊ नये असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

MoU
महाराष्ट्र

MoU : एमएमआर क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी चार लाख सात हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार

मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआर) क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी मंगळवारी चार लाख सात हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे एमएमआरमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल. तसेच मुंबई आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे

Ramdas Athawale
महाराष्ट्र

Ramdas Athawale : अजून 10 ते 15 वर्षे हयात राहिले असते, तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान झाले असते, रामदास आठवले यांचे प्रतिपादन

संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे. राजेंद्र प्रसाद आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून संबोधले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्यात अजून 10 ते 15 वर्षे राहिले असते, तर ते पंतप्रधान झाले असते, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Chhatrapati Sambhajinagar
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस

छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलीस स्टेशन येथे मंगळवार, ८ एप्रिल रोजी एफआयआर क्र. १५० दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंबंधी केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने कार्यालयीन संचिकाची छाननी करुन तपासणी करत असताना काही लोकांनी जन्म-मृत्यू नोंदणी आदेश मिळण्यासाठी कार्यालयास चुकीची, बनावट कागदपत्रे सादर केल्याचे दिसून आलेले आहे.

Chandrashekhar Bawankule
मुंबई

chandrashekhar bawankule रॉयल्टी बुडवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा, महसूल मंत्र्यांचे आदेश

रॉयल्टी बुडवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून याप्रकरणी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करा, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

10th-12th board
पुणे

10th-12th board दहावी- बारावी बाेर्डाची वेबसाईट हाेणार सायबर सुरक्षित, निकालाच्या दिवशी येणार नाही ताण

दहावी आणि बारावीच्या निकालाच्या दिवशी वेबसाईवर ताण येऊ नये तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये

Kedar Jadhav
देश-विदेश

Kedar Jadhav : माजी क्रिकेटपटू केदार जाधवची राजकारणात नवी इनिंग

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवने राजकारणात एन्ट्री केली आहे. आज भाजपात प्रवेश करून त्याने नवीन इनिंग सुरू केली. मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केदार जाधव याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आहे.

Phule Movie
महाराष्ट्र

Phule Movie : चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो, ‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाच्या नेत्याचा आक्षेप

फुले’ या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट एकतर्फी नसावा. चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो  त्याचप्रमाणे त्याकाळी ब्राह्मण महासंघाने केलेली. मदतही चित्रपटात दाखवा, अशी मागणी त्यांनी केली.

Sandeep Deshpande
मुंबई

Sandeep Deshpande : भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का, मनसेच्या इशाऱ्याने परप्रांतीय वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे

मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची विनंती विशेष न्यायालयाकडून मान्य, ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून सुनावणी

‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून सुनावणी घ्यावी अशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेली विनंती विशेष न्यायालयाने मान्य केली आहे.