Arvind Kejriwal : म्हणे रावण सोनेरी हरीण बनून आला, केजरीवालांनी सांगितली रामायणाची चुकीची गोष्ट

Arvind Kejriwal : म्हणे रावण सोनेरी हरीण बनून आला, केजरीवालांनी सांगितली रामायणाची चुकीची गोष्ट

Arvind Kejriwal

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: हिंदू मते मिळविण्यासाठी हनुमान चालिसा म्हणून दाखविणाऱ्या दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रामायणाची चुकीची गोष्ट सांगितले त्यांच्याविरुद्ध टीका होत आहे. सिताहरण करण्यासाठी रावण सोनेरी हरीण बनून आला असे ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत रामायणातील एक गोष्ट सांगितली, ज्यावरून सध्या मोठा वाद उभा राहिला आहे. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना केजरीवाल यांनी दिलेल्या या वक्तव्यामुळे भाजपने त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

केजरीवाल यांनी झोपडपट्टीवासीयांशी संवाद साधताना रामायणातील सीता हरणाचा संदर्भ घेतला. त्यांनी सांगितले, “वनवासाच्या काळात एके दिवशी भगवान श्रीराम अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेले होते. जाताना त्यांनी सीता मातेची काळजी घेण्याची जबाबदारी लहान भाऊ लक्ष्मण यांच्यावर सोपवली. या दरम्यान, रावण सोनेरी हरण बनून आला. सीता मातेने तो हरण पाहून लक्ष्मण यांना तो पकडून आणण्याचा आग्रह केला. मात्र, लक्ष्मणांनी नकार दिला. अखेरीस सीता मातेच्या आदेशावर लक्ष्मण गेले आणि रावणाने आपला वेष बदलून सीता मातेचे हरण केले.”

केजरीवाल यांनी या गोष्टीचा संदर्भ घेत भाजपवर टीका करताना म्हटले, “भाजपही सोनेरी हरणासारखीच आहे, फसवणूक करणारी. तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू नका, अन्यथा तुमचेही हरण होईल.”


Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार


या वक्तव्यानंतर भाजपने केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजप प्रवक्त्यांनी म्हटले, “केजरीवाल यांनी रामायणातील कथा चुकीची सांगून हिंदूंच्या भावनांचा अपमान केला आहे. रामायणात रावण सोनेरी हरण बनला नव्हता, तर मारीच नावाच्या राक्षसाने सोनेरी हरणाचा वेष घेतला होता. रावण साधू बनून सीता मातेचे हरण करण्यासाठी आला होता. केजरीवाल यांनी हिंदू धर्म आणि रामायणाचा अभ्यास न करता निवडणुकीसाठी याचा चुकीचा उपयोग केला आहे. त्यांना या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागेल.”

रामायणातील सत्य घटना:

रामायणाच्या अरण्यकांडात मारीच नावाच्या राक्षसाने सोनेरी हरणाचा वेष घेतला होता. रावणाच्या आदेशानुसार मारीचाने हे केले. सीता मातेने त्या हरणाला पाहून श्रीरामांना ते पकडून आणण्यास सांगितले. श्रीराम हरणाचा पाठलाग करत गेले आणि मारीचाला बाण मारला. मरताना मारीचाने रामांच्या आवाजात “लक्ष्मण, सीता” अशी हाक दिली. त्यामुळे चिंताग्रस्त होऊन सीता मातेने लक्ष्मणांना श्रीरामांच्या मदतीसाठी पाठवले. लक्ष्मणांनी जाताना सीता मातेच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मण रेषा आखली होती. त्यानंतर रावण साधूच्या वेशात आला आणि सीता मातेची फसवणूक करून त्यांचे हरण केले.

केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण अधिक तापले असून त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद सुरू आहे. भाजपने त्यांना “चुनावी हिंदू” असे म्हणत, माफी मागण्याची मागणी केली आहे.

Arvind Kejriwal told the wrong story of Ramayana

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023