सरकारी पैशातून बाबरी बांधण्यापासून सरदार पटेलांनी नेहरूंना रोखले, राजनाथ सिंह यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

वडोदरा: देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बाबरी मशिदीचे बांधकाम सरकारी पैशातून करू इच्छित होते, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना तसे करू दिले नाही, असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गुजरात सरकारच्या युनिटी मार्चमध्ये सहभागी झाले असताना राजनाथ सिंहम्हणाले नेहरू यांनी जेव्हा सोमनाथ मंदिरावर (गुजरात) खर्चाचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा पटेल म्हणाले होते की, जनतेने दान केलेले ₹30 लाख यात खर्च झाले होते. म्हणूनच ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. सरकारी पैसा खर्च झाला नव्हता.
राजनाथ म्हणाले की, सोमनाथ मंदिराप्रमाणेच अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातही सरकारचा पैसा लागलेला नाही. संपूर्ण खर्च जनतेने उचलला आहे.

संरक्षण मंत्र्यांनी दावा केला की, पटेल यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकासाठी जनतेने जमा केलेली रक्कम नेहरू यांनी ‘विहिरी आणि रस्ते बांधकामात’ वापरण्याचा सल्ला दिला होता, जो पूर्णपणे हास्यास्पद होता.



राजनाथ सिंह म्हणाले, 1946 मध्ये बहुसंख्य काँग्रेस समित्यांनी वल्लभभाई पटेल यांना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. गांधीजींच्या आग्रहावरून पटेल यांनी आपले नाव मागे घेतले आणि नेहरू अध्यक्ष झाले. जर पटेल पंतप्रधान झाले असते, तर काश्मीरची स्थिती वेगळी असती. अनुच्छेद 370 हटवणे हा ऐतिहासिक निर्णय आहे. वल्लभभाई पटेल संवादावर विश्वास ठेवत होते, पण गरज पडल्यास कठोर पाऊले उचलत होते, जसे हैदराबादच्या एकीकरणाच्या वेळी झाले.

सध्याच्या केंद्र सरकारनेही ऑपरेशन सिंदूरद्वारे तोच संदेश दिला की, भारताला शांतता हवी आहे, पण चिथावणी दिल्यास सडेतोड उत्तर देईल. नेहरूंनी स्वतःला भारतरत्नने सन्मानित केले, पण त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतरत्नने सन्मानित का केले नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवून सरदार पटेल यांना योग्य सन्मान देण्याचा निर्णय घेतला. हे आपल्या पंतप्रधानांचे खरोखरच कौतुकास्पद कार्य आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, मोरारजी देसाई 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. जर ते भारताचे पंतप्रधान बनू शकत होते, तर सरदार पटेल, जे 80 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते, ते का बनू शकत नव्हते? पटेल यांना पंतप्रधान यासाठी बनवले नाही की ते खूप म्हातारे झाले होते, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे.

Sardar Patel stopped Nehru from building Babri with government money, Rajnath Singh alleges

महत्वाच्या बातम्या