विशेष प्रतिनिधी
पुणे: आपण उत्तर दिले ही वेगळी गोष्ट आहे. पण ऑपरेशन सिंदूरमुळे आनंद झाला नाही. कारण पहलगाम हल्ला कशामुळे झाला? पंचवीस लोकांचा जीव घेणारे हल्लेखोर आत कसे आले? ते अजून मोकळे फिरतायेत. आपण हे प्रश्न विचारायला नको का असा सवाल मनसे नेते अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांनी केला आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २५ लोकांनी जीव गमावला. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली.
अमित ठाकरे म्हणाले, देशभरामध्ये कौतुक होतंय. आपल्या भारताच्या सैन्याला खरंच हॅट्स ऑफ. त्यांचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. पण पहलगाम घटनेनंतर जेवढं दुःख झालं होतं. तेवढा आनंद किंवा समाधान मला आज मिळालेलं नाही. कारण ते अतिरेकी अजूनही मोकळे फिरतायेत. भारतात असतील किंवा पाकिस्तान ज्यांनी केलं ते अजूनही मोकाट आहेत. त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही. न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा ते दहा बारा लोकं जे आले होते ते मरतील . ज्या अतिरेक्यांनी हल्ला केलाय त्यांना ठेचून मारा.
अमित ठाकरे राज ठाकरे यांची भूमिका मांडताना म्हणाले, जसं राज साहेब बोलले की युद्ध हे उत्तर नाही. तुम्ही सामान्य लोकांचा बळी कशाला घेताय? आपल्या सैन्याला जे सांगितलं जात ते ते करत असतात. काही लष्करचे अड्डे किंवा काही दहशतवादी अड्डे तिकडे उध्वस्त झाले आहेत. पण शेवटी हा पहलगाम हल्ला कशामुळे झाला? अजून मोकळे फिरणारे ते आत आले कसे? आपण विचारायला नको का प्रश्न? आपल्या भारतात घुसून मारलंय. त्याच्यामुळे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे. हे तर यंत्रणेचं अपयश आहे.
How did the attackers get in? They are still roaming freely, shouldn’t we ask this question? Amit Thackeray question
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत