विशेष प्रतिनिधी
सोलापूर : CM Fadnavis मदत करताना सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही. संकटात सरकार पाठीशी आहे, एकमेकांना धीर द्या, मदत सर्वांना मिळेल. सरकार कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.CM Fadnavis
पूरस्थितीमुळे राज्यातील बहुतांश भागात पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागालाही पुराचा मोठा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यातील निमगांव, दारफळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी मंत्री जयकुमार गोरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.CM Fadnavis
.https://twitter.com/CMOMaharashtra/status/1970764599558328476
पुरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मदत करताना सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही. संकटात सरकार पाठीशी आहे, एकमेकांना धीर द्या, मदत सर्वांना मिळेल. सरकार कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार. आवश्यकतेनुसार निकष शिथिल करून शेतकरी आणि नागरिकांना मदत केली जाईल.
व्यावसायिक, फळबागा, नुकसानग्रस्त सरकारी कार्यालयांनाही मदत केली जाईल. तसेच पुराचा फटका बसलेल्या वस्त्या आणि शाळांनाही मदत केली जाईल आणि तातडीची मदत लवकरच दिली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Will Spare No Effort in Extending Aid, Assures CM to Flood-Hit Farmers
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!