विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah “जो कोणी शस्त्र उचलेल, त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल. गोळीला उत्तर गोळीनेच दिले जाईल,” असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलताना दिला.Amit Shah
शाह म्हणाले की, चर्चा करण्यास तयार असणाऱ्यांशी सरकार संवाद साधण्यास तयार आहे, मात्र हिंसक मार्ग स्वीकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, “७० वर्षांपैकी ६० वर्षे सत्ता असूनही विकास का झाला नाही?” असा सवाल उपस्थित केला.Amit Shah
नक्षलवादावर चर्चा करताना त्यांनी रेड कॉरिडॉरमधील राज्यांचे आभार मानले आणि छत्तीसगडमधील बस्तर भागात नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याचा दावा केला. बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा आणि शिधावाटप दुकाने उघडण्याच्या मोहिमा राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.Amit Shah
शाह यांनी नक्षलवादाचे मूळ कारण विकासाअभावी नसून ती एक विचारसरणी असल्याचे म्हटले आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवादी विचारसरणीचा स्वीकार केल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी ऑपरेशन बुद्धा, ऑपरेशन थंडरस्टॉर्म आणि ऑपरेशन भीमबांधा यांचा उल्लेख करत अनेक भाग नक्षलवाद्यांपासून मुक्त झाल्याचे सांगितले. २१ दिवस चाललेल्या ब्लॅक फॉरेस्ट मोहिमेत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कोब्रा, छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांचे त्यांनी कौतुक केले.
शाह यांनी नक्षलवादाचा इतिहास सांगताना १९६९ मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी येथे या चळवळीची सुरुवात झाल्याचे नमूद केले. पुढे ही चळवळ अनेक राज्यांमध्ये पसरत गेली आणि २००४ मध्ये दोन गटांच्या विलीनीकरणातून सीपीआय (माओवादी) स्थापन झाल्याचे त्यांनी सांगितले.
सभागृहात बोलताना शाह यांनी काही प्रमुख नक्षलवाद्यांचा उल्लेख करत त्यांच्यावर झालेल्या कारवायांची माहिती दिली, तसेच काही जणांनी आत्मसमर्पण केल्याचेही सांगितले.
सरकार नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी कटिबद्ध असून विकास आणि सुरक्षा या दोन्ही आघाड्यांवर काम सुरू असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
Bullets for bullets: Amit Shah’s strong attack on Naxalism in Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर