Aditya Thackeray : पीओके घेणार म्हणणारे बांगलादेशी घुसले कसे ह्याचे उत्तर देऊ शकत नाही, आदित्य ठाकरे यांची टीका
जे प्रत्येक निवडणुकीत सांगतात कि ते पाकव्याप्त काश्मीर (पीओके) घेणार, ते आता बांगलादेशी घुसले कसे ह्याचे उत्तर देऊ शकत नाही. पण प्रत्येक अपयशाचा इव्हेन्ट कसा करायचा, हे ह्या भाजपकडून शिकायचे! जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर शिरले असतील, तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात अपयश आले; हे केंद्र व राज्य सरकारने का लपवले? ह्यातून एकच सिद्ध होते की राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.











