Amit Shah प्रस्ताव पाठवा, मदत देऊ, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर : महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. २०२५-२६ या वर्षांसाठी केंद्र सरकारने कर हप्त्यापोटी ३,१३२ कोटी महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २,२०० कोटींची मदत केली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला पंचनाम्याचा सविस्तर अहवाल पाठवावा, त्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच मदत जाहीर करतील, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिले. Amit Shah

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण आणि लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील तसेच पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी लोणी अहिल्यानगार येथे पार पडले. Amit Shah



शाह म्हणाले, केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार १३२ कोटींची मदत मंजूर केली आहे. यापैकी एप्रिलमध्ये १ हजार ६३१ कोटी वाटप करण्यात आले असून, यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटींचे विशेष मदत पॅकेज देण्यात आले आहे. कर्जवसुलीवर तात्पुरती स्थगिती व विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये सवलती यांसारखे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मविभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार आंदोलन, ग्रामीण विकास व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. त्यांच्या कार्याच्या पायावर आज महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र उभे आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांनी सहकार चळवळीची पायाभरणी केली. विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया रचला. व्यापाऱ्यांच्या घरात जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जाऊ लागला असल्याचे शाह यांनी सांगितले.

Send proposal, provide assistance, Union Home Minister Amit Shah assures to help flood-affected farmers

महत्वाच्या बातम्या