विशेष प्रतिनिधी
Pune News : पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष आता थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला आहे. विमानतळ रद्द करण्यासाठी आता पुरंदर तालुक्यातील बाधित गावातील शेतकरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवुन साकडे घालणार आहेत. Purandar Airport
या पत्राच्या माध्यमातून त्यांनी केवळ विमानतळ रद्द करण्याची मागणीच नाही तर भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “राज्यघटना वाचवा, लोकशाही वाचवा, पुरंदर वाचवा” या टॅगलाइनसह राष्ट्रपतींना लिहिलेल्या या पत्रात एक जबाबदार घटनात्मक पालक म्हणून हस्तक्षेप करावा, अशी विनंती राष्ट्रपतींना करण्यात आली आहे.
पत्रात म्हटले आहे की, गेल्या 10 वर्षांपासून आम्ही शांततामय आणि घटनात्मक मार्गाने पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा सातत्याने विरोध करत आहोत. 5 फेब्रुवारी 2018 रोजी आम्हा शेतकऱ्यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना “इच्छा मृत्यु” सारख्या तीव्र भावना व्यक्त करणारे पत्र पाठवले होते. परंतु आजपर्यंत त्याला कुठलाही उत्तर मिळालेले नाही.आजही आम्ही भारतीय नागरिक असूनही, आपल्या देशातच आमच्या न्यायासाठी केलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जर हा प्रकल्प राष्ट्रीय सुरक्षेच्या निकषांवर खरा उतरत नसेल, तर तो इतक्या आक्रमकतेने पुढे का नेला जात आहे? असा सवाल देखील या पत्रांमधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विचारण्यात आला आहे.आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या भूमीत आमच्या इच्छेविरुद्ध व्यावसायिक हस्तक्षेप होत आहे. घटनात्मक मार्गाने आपली व्यथा मांडणाऱ्या नागरिकांच्या भावना अशा प्रकारे दुर्लक्षित केल्या जाणार का? असा सवालही शेतकऱ्यांनी केला आहे. ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही. तर ही लढाई आहे ती आमच्या भूमी अधिकारांची, लोकशाहीच्या रक्षणाची आणि भारतीय राज्यघटनेतील वचनांच्या सन्मानाची असल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे.
पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळाला तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. काही झाले, तरी विमानतळ होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. विमानतळाच्या विरोधासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलने देखील करण्यात आली. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर सरकारने पुरंदर विमानतळाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता बाधित गावातील शेतकरी विमानतळ रद्द करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र पाठवणार आहेत. Purandar Airport
The affected people of Purandar Airport will be directly informed to the President.
महत्वाच्या बातम्या
- Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा
- Narendra Modi : गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- Sanjay Raut : जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात, संजय राऊत यांची टीका