विशेष प्रतिनिधी
मुंबई : Yashomati Thakur राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणामागे भाजपचा हात आहे. महायुती सरकार टक्केवारीचे आहे. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्यासाठी भाजपनेच रचलेले हे कुभांड असू शकते, असा संशय काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.Yashomati Thakur
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे यांना 50 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे. चक्क मंत्रालयात लाचखोरीची ही घटना घडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मंत्री झिरवाळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण तत्काळ राजीनामा देऊ अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.Yashomati Thakur
नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लार्कला लाच घेताना पकडणे, हे भाजपचे राजकीय षडयंत्र असू शकते. विरोधकांना आणि मित्रपक्षांना बदनाम करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करणे हा यांचा जुना धंदा आहे. स्वतः ‘टक्केवारी’ च्या चिखलात रुतलेल्या सरकारने दुसऱ्यावर चिखलफेक करू नये. हे टक्केवारीचे सरकार आहे. आता मंत्रालयातही या गोष्टी चालू झाल्या आहेत. कोणत्याही कार्यालयात जा टक्केवारीचा हिशोब आहे. आता ते उघड झाले आहे. प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयात उघडपणे टक्केवारी मागितली जाते, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
सध्या शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. त्यांच्या मालाला भाव नाही. टॅरिफच्या मुद्यावर केंद्र सरकार तोंड उघडायला तयार नाही. सरकारचा प्रत्येक निर्णय हा बळीराजाच्या विरोधात येत आहे. भाजपने देश अमेरिकेला विकला आहे. पंतप्रधान मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात, पण साधी पत्रकार परिषद ते घेऊ शकत नाहीत. ते महिलांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्या म्हणाल्या.
Yashomati Thakur Alleges BJP Plot To Defame Zirwal
महत्वाच्या बातम्या
- व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल
- Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा
- “तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल
- संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया