विशेष प्रतिनिधी
मुंबई : Karjat-Lonavala कर्जत-लोणावळा घाट विभागात दरड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानंतर मध्य रेल्वेने 6 जुलै रोजी सुमारे 80 हजार प्रवाशांना एकूण 5.91 कोटी रुपयांचा तिकीट परतावा दिला. रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी आणि विशेष मदत कक्षांच्या माध्यमातून परताव्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली.Karjat-Lonavala
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, एकूण 79 हजार 747 प्रवाशांना 5.91 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. गेल्या वर्षी याच दिवशीच्या तुलनेत परताव्याची रक्कम आणि लाभार्थी प्रवाशांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.Karjat-Lonavala
कर्जत-लोणावळा घाट विभागात दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या, तर अनेक गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास रद्द झाला. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी सर्व विभागांमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच रेल्वे स्थानकांवर विशेष मदत कक्ष सुरू करून पात्र प्रवाशांना कोणताही विलंब न लावता परतावा देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई विभागात सर्वाधिक परतावा देण्यात आला. या विभागात 37 हजार 330 प्रवाशांना 2.86 कोटी रुपयांचा परतावा मिळाला. तर पुणे विभागात 20 हजार 982 प्रवाशांना 1.56 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत परताव्याच्या रकमेतील वाढ 96 टक्के, तर लाभार्थी प्रवाशांच्या संख्येत 106 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.
दरम्यान, करजात-लोणावळा घाट विभागात रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वे गाडीची अद्ययावत स्थिती तपासावी तसेच रेल्वे हेल्पलाईन किंवा स्थानकावरील चौकशी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
Central Railway Refunds ₹5.91 Crore After Karjat-Lonavala Route Shutdown
महत्वाच्या बातम्या