विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर काही देशांनी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली आहे. तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला असून, कतारने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्स एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटले की, “भारताने केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण युद्धाचा धोका वाढला आहे. आम्ही अशा भडकावू कृतींचा आणि नागरिक तसेच नागरी पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो.”
या निवेदनात तुर्कस्तानने भारत-पाकिस्तान दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि एकतर्फी कारवाया टाळण्याचे आवाहन केले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी, या पाकिस्तानच्या मागणीचेही त्यांनी समर्थन केले.
अझरबैजानने देखील भारताच्या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानमधील हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव आमच्या चिंतेचा विषय आहे. आम्ही पाकिस्तानवर झालेल्या लष्करी हल्ल्यांचा निषेध करतो, ज्यामध्ये अनेक नागरिक ठार आणि जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या नागरिकांप्रती आमची सहवेदना असून, जखमींनी लवकर बरे होवो, हीच आमची प्रार्थना आहे.”
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील एक्सवर निवेदन प्रसिद्ध करत दोन्ही देशांनी संयम राखावा आणि सुबुद्धीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले. कतारने सांगितले की, “भारत आणि पाकिस्तानने चांगल्या शेजारधर्माचे पालन करावे, आणि कोणतेही मतभेद शांततामय मार्गाने, संवादाच्या माध्यमातून सोडवावेत.”
२६ नागरिकांच्या जीव घेतलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी केंद्रांवर अचूक हल्ले केले. जगभरातून या कारवाईचे समर्थन झाले असताना, काही मुस्लिम देशांनी मात्र पाकिस्तानच्या बाजूने उभे राहत भारताच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.
Turkey, Azerbaijan back Pakistan after Operation Sindoor; Qatar appeals for restraint
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत