Uddhav Thackeray : ईव्हीएममुळे नाही तर गाफील राहिल्यामुळे पराभव, उध्दव ठाकरेंनी केले मान्य

Uddhav Thackeray : ईव्हीएममुळे नाही तर गाफील राहिल्यामुळे पराभव, उध्दव ठाकरेंनी केले मान्य

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray महाराष्ट्रात झालेल्या पराभवाला ईव्हीएम कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र ईव्हीएम मुळे नाही तर गावी राहिल्यामुळे पराभव झाल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केले आहे.Uddhav Thackeray

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज निर्धार शिबिरात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून झालेली चूक जाहीरपणे मान्य केली. पराभवामागील कारण सांगताना ठाकरे म्हणाले , “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की, आपण गाफील राहिलो. लोकसभेला आपण आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो, त्वेषाने लढलो. तर महायुती लोकसभेला आपणच जिंकणार कारण मोदी आहेत अशा अविर्भावात होती..

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका आल्या. मधल्या काळात मतदारांचे घुसवाघुसवी झाली. आपण ज्या मानसिकतेत होतो की, आपल्याला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत, अगदी आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट शिवून तयार होते. बस आता जिंकलोच, मी घोड्यावर बसणार आणि विधानसभेत जाणार. त्या निकालानंतर मला काही जणांनी सांगितलं, काँग्रेसवाले काही लोक आले, राष्ट्रवादीवाले काही आले, आणि म्हणाले एक चूक झाली ती झालीच. ते नाव जाहीर करायचं सोडून द्या. त्याचा इतिहास झाला. पण त्यांनी सांगितलेलं फार महत्त्वाचं होतं. विधानसभेत आपण केलेलं काम हे जागांच्या साठेमारीत आपणच मारुन टाकलं”, असं उद्धव ठाकरे जाहीरपणे म्हणाले.

हे खरं आहे. आपण काय करत गेलो? तुम्ही किती देणार? एवढे, तुम्ही काय करणार हे, आम्ही हे, याच्यात राहिलो. अरे पण आपण उत्तमरित्या सरकार चालवून दाखवलं. जगभरात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती होती त्यावेळीही आपण महाराष्ट्र थांबू दिला नव्हता हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही. तेच काम त्यांनी केलं. भ्रष्टाचाराचा नुसता आगडोंब केला. इथे सुरज बसला आहे. काय? खिचडी घोटाळा? संजय राऊतला आतमध्ये टाकलं होतं. पण घाबरुन सोडून दिलं. जा बाबा जा. तिकडे गेलास तर बरं. काही शेपट्या घालून गेले. त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जणू काही गंगास्नान घातलं”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Defeat not due to EVM but due to negligence, Uddhav Thackeray admits

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023