विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vijay Vadettiwar महाराष्ट्र, मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे असा आराेप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.Vijay Vadettiwar
वडेट्टीवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी होती. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली नाही. आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात यातून इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला धक्का लागला, असे मानण्याचे कारण नाही.Vijay Vadettiwar
मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे. मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे. त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी लढावे लागणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती. मनसेबाबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस हा पक्ष जातीयवाद, धर्मवाद करत नाही. काँग्रेस हा संविधान मानणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकासासाठी आमच्या पाठीशी जनतेने उभे राहावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.
Work is underway to connect Mumbai to Gujarat, alleges Vijay Vadettiwar
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला